
India’s Ministry of External Affairs criticised Pakistan’s Youm-e-Istehsal observance on 5 August. It called the event an effort to spread false claims about India and divert attention from Pakistan’s human rights record…
पाकिस्तानने ५ ऑगस्ट रोजी पाळलेल्या 'यौम-ए-इस्तेहसाल'चा भारताने निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा केवळ खोटा प्रचार असल्याचे म्हटले आहे. स्वतःच्या देशातील मानवी हक्कांचे उल्लंघन आणि दहशतवादाशी असलेले संबंध यावरून लक्ष भरकटवण्यासाठी पाकिस्तान अशा प्रकारची कृती करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. काश्मीरवर खोटी विधाने करून पाकिस्तान केवळ प्रक्षोभक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप भारताने केला आहे.